
भरत मोहोळकर, साम टिव्ही
मुंबई : सरकारच्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात आंदोलनाची ठिणगी पडलीय. हिंदी सक्ती मागे घेण्याची मागणी सर्वच स्तरावरून केली जातेय. मात्र हिंदी सक्तीच्या मुद्दयावर नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दिक्षितसह मराठी कलाकार गप्प का? असा सवालच राऊतांनी केलाय.
हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साहित्यिकांशी चर्चा करुन निर्णय घेण्याची भूमिका घेतलीय. मात्र सरकारचे लाभार्थी साहित्यिक भूमिका घेत नसल्याने राऊतांनी संताप व्यक्त केलाय. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र हिंदी सक्तीचं प्रकरण नेमकं कुठून आलं? पाहूयात.
मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार त्रिभाषा सूत्र नवीन शिक्षण धोरण
2024 मध्ये शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती
आराखड्यात समितीकडून हिंदी सक्तीचा उल्लेख
16 एप्रिल 2025
पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर
विरोधानंतर हिंदी सक्तीचा निर्णय मागे
16 जून 2025
शुद्धीपत्रक काढून हिंदीबाबतचा अनिवार्य शब्द हटवला
राज्यात हिंदी सक्तीला राजकीय पक्षांनी आणि अगदीच मोजक्या साहित्यिक आणि कलाकारांनी विरोध केलाय. मात्र अनेक दिग्गज कलाकारांनी या मुद्द्यावर मौन बाळगणंच पसंत केलंय. निदान मराठीच्या मुद्दयावर तरी कलाकारांनी व्यक्त व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे. त्यामुळे आता राऊतांच्या टीकेनंतर तरी मराठी कलाकार ठोस भूमिका घेणार की हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.