Mumbai Dam Water Level: मुंबईकरांनो पाण्याची चिंता विसरा! पुरून उरेल इतका पाणीसाठा जमा; सातही धरणात किती टक्के पाणी?

Mumbai Rain And Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या मुंबईतील सात जलाशयांमधील पाण्याची पातळी 93.23 टक्क्यांवर पोहोचली.
मुंबईकरांनो पाण्याची चिंता विसरा! पुरून उरेल इतका पाणीसाठा जमा; सातही धरणात किती टक्के पाणी?
Mumbai Dam Water LevelSaam Tv
Published On

मुंबईत गेल्या दीड महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या मुंबईतील सात जलाशयांमधील पाण्याची पातळी 93.23 टक्क्यांवर पोहोचली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या साठी तलावांमध्ये एकत्रित पाणीसाठा सध्या 13,49,365 मिलियन लिटर इतका आहे, जो क्षमतेच्या 93.23 टक्के इतका आहे.

मुंबईकरांनो पाण्याची चिंता विसरा! पुरून उरेल इतका पाणीसाठा जमा; सातही धरणात किती टक्के पाणी?
Ladki Bahin Yojana : पुण्यात भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा

मुंबईला तुलसी , तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या धरणातून पाणी पुरवले जाते. यातच बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, खालीलप्रमाणे धरणाच्या पाणीसाठात वाढ झाली आहे.

- अप्पर वैतरणा - 89.10 टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - 98.91 टक्के पाणीसाठा.

- तानसा - 97.80 टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - 97.14 टक्के पाणीसाठा

- भातसा - 91.20 टक्के पाणीसाठा.

- विहार - 100 टक्के पाणीसाठा.

- तुलसी - 99.46 टक्के पाणीसाठा

मुंबईकरांनो पाण्याची चिंता विसरा! पुरून उरेल इतका पाणीसाठा जमा; सातही धरणात किती टक्के पाणी?
IPS Nalin Prabhat : NSG च्या महासंचालकांची तडकाफडकी जम्मू काश्मीरमध्ये बदली; 12 तासात दिली मोठी जबाबदारी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणखी एक तलाव, मध्य वैतरणा तलाव 4 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे विहार आणि मोडक सागर तलाव 25 जुलै रोजी मोठ्या प्रमाण पाणीसाठा जमा झाला. 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तानसा तलाव ओव्हरफ्लो झाला, त्यामुळे सातही जलाशयांमध्ये एकाच दिवसात 17 दिवसांनी पाणीसाठा वाढला.

ठाण्यातील शाहपूर भागात असलेल्या तानसा तलावातून मुंबईला अंदाजे 400 मिलियन गॅलन पाणीपुरवठा केला जातो. 26 जुलै 2024 रोजी हाही ओव्हरफ्लो झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com