Titwala News : शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाचा घाला; भरधाव वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Titwala Road Accident update: टिटवाळ्यात शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाने झडप घातली आहे. भरधाव वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघांच्या मृत्यूने टिटवाळा शोककळा पसरली आहे.
 शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाचा घाला; भरधाव वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू
Titwala Road AccidentSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

टिटवाळा : टिटवाळा येथून साई पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या तिघा साईभक्तांवर काळाने झडप घातली आहे. भरधाव कारच्या धडकेत तीन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. घोटी सिन्नरदरम्यान ही घटना घडली आहे. तिन्ही जण टिटवाळा मांडा कोळीवाडा परिसरातील रहिवासी होते.

या अपघातात भावेश राम पाटील, रवींद्र उर्फ कवी सुरेश पाटील आणि साई राज भोईर या तिघांचा मृत्यू झाला आहे. रवींद्र आणि भावेश हे चुलत भाऊ आहेत. रवींद्र यांचे लग्न झालेले आहे. त्यांना दोन लहान मुली आहेत. रिक्षा चालवून रवींद्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या अपघाताला १६ तासांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी पोलिसांनी वाहकाला शोधलेलं नाही. तसेच कारवाई केली नाही,असा आरोप रवींद्र आणि भावेश यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. रवींद्र यांच्या कुटुंबीयांकडून वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाचा घाला; भरधाव वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू
Raver Accident : लग्न समारंभातून परतताना काळाचा घाला; बसची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा मृत्यू

नेमकं काय घडलं?

साई आश्रय सेवा मंडळातर्फे शिर्डी येथे पायी चालत पालखी नेली जाते. या पालखीत या परिसरातील सुमारे दीडशे जण सहभागी होतात. यंदा देखील शनिवारी 13 तारखेला हे पालखी टिटवाळ्याहून शिर्डीच्या दिशेने पायी निघाली. या पालखीसोबत रवींद्र पाटील ,भावेश पाटील, साईराज भोईर व सलमान खान हे चौघे होते.

मंगळवारी रात्री आठ वाजण्यच्या सुमारास पालखी घोटी आणि सिन्नरदरम्यान पोहोचली. रवींद्र पाटील,भावेश पाटील, साईराज भोईर आणि सलमान खान या चार जणांना भरधाव वाहनाने उडवले. या धडकेत रवींद्र, भावेश ,साईराज भोईर हे गंभीर जखमी झाले. तर सलमान खानला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर चौघांना रुग्णालयात दाखल केले. रवींद्र पाटील, भावेश पाटील आणि साईराज भोईर या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सलमानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाचा घाला; भरधाव वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू
Yavatmal ST Bus Accident : यवतमाळमध्ये वारकऱ्यांच्या एसटी बसला अपघात; 45 जणांचा थोडक्यात वाचला जीव

या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे टिटवाळा मांडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेला 16 तास उलटून अद्यापही संबंधित वाहन चालकावर काहीच कारवाई न झाल्याने भावेश व रवींद्रच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. या तिघांचा मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या या वाहन चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com