Shrikant Shinde: 'मी तिकीट देऊन चूक केली', उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले...

Shrikant Shinde On Uddhav Thackeray: श्रीकांत शिंदे यांना तिकीट देऊन चूक केली, असं उद्धव ठाकरे आज डोंबिवलीत म्हणाले होते. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Shrikant Shinde On Uddhav Thackeray
Shrikant Shinde On Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Shrikant Shinde On Uddhav Thackeray:

श्रीकांत शिंदे यांना तिकीट देऊन चूक केली, असं उद्धव ठाकरे आज डोंबिवलीत म्हणाले होते. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उभे केले. त्यावेळेला दोन आमदारांचे तिकीट कापले आणि आज हे आम्हालाच चोर म्हणत आहेत.''

ते म्हणाले, ''आम्ही घराणेशाही सारखे काम करत नाही. आमच्या पक्षात वेगवेगळे नेते आहेत. विविध नेते वेगवेगळ्या पद भूषवित आहेत. ज्यावेळी कल्याण येथे लढायला कोणी नव्हते त्यावेळी आम्ही होतो.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shrikant Shinde On Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: 'शाखा पळवलीत, आमचं सरकार येऊ देत मग...', शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडली

घराणेशाहीच्या आरोपांवर बोलताना आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आलटून-पालटून आमच्याशी कोणीही लढा आम्ही घाबरत नाही, असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले. राम मंदिराच्या निमित्ताने सगळीकडे आनंद साजरा व्हावा यासाठी शिधा वाटप करण्यात आले. या शिधा वाटप कार्यक्रमानिमित्त ते डोंबिवली येथील नेमाडे गल्लीत आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले.  (Latest Marathi News)

श्रीकांत शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे स्वागत मी अगोदरच केले आहे. आज लोकसभा दौरा केल्यानंतर खऱ्या परिस्थितीची जाणीव त्यांना झाली असेल. हे त्यांनी पूर्वीच करणे अपेक्षित होते. पूर्वी आम्ही एकत्र होतो, त्यावेळी जेव्हा यायचे तेव्हाची गर्दी आणि आताची गर्दी यांच्यातील फरक त्यांना कळला असेल. वाईट या गोष्टीचं वाटत सर्व पक्ष एकत्र येऊन सुद्धा दोनशे ते तीनशे लोक जमू शकत नाही.

Shrikant Shinde On Uddhav Thackeray
Maldives India Controversy: आम्हाला कोणीही उठून धमकवू शकत नाही, मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा रोख भारताकडे

ते म्हणाले, या गोष्टीची त्यांना जाणीव झाली असेलच. गल्लोगल्ली त्याठिकाणी फिरावे लागते. तेच शब्द तेच टोमणे लोकांना कंटाळा आला आहे लोकांना काम हवं आहे ते काम आम्ही करत आहोत. त्यामुळे लोक आमच्या बाजूनेच आहेत. पातळी सोडून भाष्य केलं जात आहे. आम्ही कधीही पातळी सोडून राजकारण केलं नाही. आमच्यावर आमच्यावर चांगले संस्कार आमच्या आई-बाबांनी केलेले आहेत. आमची प्रायव्हेट कंपनी नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com