Sanjay Raut On Raj Thackeray: 'भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा...'; संजय राऊतांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: खारघर दुर्घटना प्रकरणावरून राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला आहे.
Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut on Raj Thackeray's Sabha
Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut on Raj Thackeray's Sabha Saam Tv

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेवर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे यांनी कोरोनाकाळातील नियोजनावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. याच टीकेचा आधार घेत खारघर दुर्घटना प्रकरणावरून राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला आहे.

'भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवलेले आहेत. त्यांना बोलू द्या, पोपटपंची करू द्या. गंगेमध्ये हजारांहून अधिक प्रेते वाहत गेली. नोटबंदी काळात रांगेत काही लोकांचा मृत्यू झाला. हा सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा आहे. त्याच्यावरती सुद्धा त्यांना बोलायला सांगा, भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा, असा टोला राऊत यांनी लगवाला. (Latest Marathi News)

Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut on Raj Thackeray's Sabha
Ajit Pawar On Sajay Raut: कोण संजय राऊत? अजित पवारांचा पत्रकारांना खोचक सवाल; नेमकं काय घडलं?

'ते जगाचे नेते आहेत. काय मागण्या करताय? कोणासाठी करताय? लोक तडफडून मेले आणि बाजूला मेजवानांना सुरू आहेत. त्या मेजवानीवर बोला. ढिसाळ आयोजनावर बोला, कशा करीता हा खारघरचा कार्यक्रम केला त्याच्यावरही बोला. 'उठ सूट उद्धव ठाकरे, झोपेत उद्धव ठाकरे आणि जागेपणी उद्धव ठाकरे, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला

खारघर प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले, 'खारघर प्रकरणात मृतांचा आकडा ५ नंतर सात झाला, त्यानंतर नऊ झाला, त्यानंतर 11 झाला आणि आता तो आकडा १४ वर आला आहे. रुग्णालयात हे लोक जे अत्यावश्यक परिस्थितीत आपल्या घराकडे निघाले होते, ते आपल्या घराकडे पोहोचलेत की नाही त्यातील अनेकांची परिस्थिती गंभीर होती'.

Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut on Raj Thackeray's Sabha
Covid Center घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकरांसह तिघांवर पुण्यात गुन्हा दाखल

'आमच्या मनात भीती आहे, त्यांचा आकडा 50 वर जाऊ शकतो. ही जर माझी भूमिका असेल तर भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटातील लोकांना यातना होण्याची गरज काय? हा आकडा आला त्याला जबाबदार कोण आहे? ढिसाळ कारभार कोणी केलं, लोकांना उन्हात ठेवलं. त्यांना पाणी का मिळालं नाही? अन्न का मिळालं नाही? त्यांची व्यवस्था काय होती? लोक 40 डिग्रीत उन्हामध्ये तडफडत होते, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com