पुण्यात पाणीटंचाईचा धोका वाढला
खडकवासला धरणातील साठा चिंतेत
१५% पाणी कपातीची शक्यता
प्रशासनाकडून पाणी बचतीचे आवाहन
काही दिवसांपूर्वी पुण्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं यंदा पाऊस लवकर आला की काय अशा प्रतिक्रिया सुद्धा आणि पुणेकरांनी व्यक्त केल्या होत्या. असं असलं तरी सुद्धा काही हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून फार काळ नसल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पाण्याच्या वापरावर होणार असल्यामुळे एप्रिल महिन्यातून जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पत्र पाठवले आहे.
या पत्रामध्ये पाणी जपून वापरावे तसेच खडकवासला धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत शिल्लक राहील याचं नियोजन करण्याची आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. तसंच पुणे शहरात १५ टक्के पाणी कपातीची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवल्याने, तसेच खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एमआयडीसीला दरमहा १५ टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.
पाणी कपात न केल्यास भविष्यात निर्माण होणाऱ्या टंचाईला सर्वस्वी संबंधित संस्था जबाबदार राहतील असं स्पष्ट मत जलसंपदा विभागाने महापालिकेला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे एका बाजूला पुणेकरांना तीव्र उन्हाच्या जाळा या सहन कराव्या लागणार आहेतच सोबतच पाणीटंचाईला देखील सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.