
भरत मोहोळकर, साम टिव्ही
पुणे : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करण्यासाठी पवारांना गळ घालत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर जयंत पाटलांच्या मागणीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भात शरद पवारांनीही सूचक वक्तव्य केलंय. मात्र जयंत पाटलांनी केलेलं वक्तव्य हे खुर्ची मजबूत करण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलीय.
लोकसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगरमध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षांतर्गत वाद उफाळून आला होता. याच सभेत रोहित पवारांनी अप्रत्यक्षरित्या जयंत पाटलांना डिवचलं तर जयंत पाटलांनीही विधानसभा निवडणूकीनंतर पदमुक्त होणार असल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं.
खरंतर विधानसभा निवडणूकीत पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागांवरच विजय मिळाल्यानंतर जयंत पाटलांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यातच आता जयंत पाटलांनी तरुणांना संधी देण्यासाठी मला पदमुक्त करा, या विनंतीमागे खुर्ची मजबूत करण्यासाठीची रणनिती आहे की पक्ष सोडण्याचे संकेत? असाच सवाल उपस्थित केला जातोय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.