Mumbai News: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; सध्या ७ धरणांमध्ये किती जलसाठा? समोर आली महत्वाची माहिती

Mumbai Dam Water Level Status: सध्या राज्यभर कडक उन्हाचा मोठा तडाखा जाणवू लागला आहे. राज्याच्या काही भागात तापमानाचा पारा तब्बल ४० अंशाच्या पुढे जाताना दिसत आहे.
Mumbai Dam Water Level Status
Mumbai Dam Water levelSaam tv

सध्या राज्यभर कडक उन्हाचा मोठा तडाखा जाणवू लागला आहे. राज्याच्या काही भागात तापमानाचा पारा तब्बल ४० अंशाच्या पुढे जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. यादरम्यान मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

Mumbai Dam Water Level Status
Mumbai Crime News: नात्याला काळिमा, घरातील एकट्या तरुणीवर पडली वाईट नजर; सावत्र आजोबाने केलं संतापजनक कृत्य

दिवसेंदिवस पाणीसाठ्यात घट

सध्या मुंबईकरांना पाणी टंचाईची काही प्रमाणात समस्या निर्माण होऊ लागली आहे. राज्यातील वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाई वाढली आहे,याचे मुख्य कारण मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

सध्याच्या वेळेला धरणांत केवळ २२.६१ टक्के पाणीसाठा उरलेला आहे. यामुळे मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या धरणांमधील सुमारे तीन लाख २७ हजार २८९ दशलक्ष लीटर आणि काही राखीव पाणीसाठा येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत जपून वापरावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत पाणी कपात करणे आवश्यक असतानाही मुंबई महापालिका काही ठोस उपाय करताना दिसून येत नाही.

मुंबईकरांना वर्षभर अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा तसेच मध्य वैतरणा, भातसा आणि विहार,तुळसी अशा सात धरणांमधून दररोज साधारण ३ हजार९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या वर्षी पाहिजे तसा पाऊस पडल्याने धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता.

परंतू या धरणांमधील शिल्लक असलेला पाणीसाठा प्रचंड वेगाने कमी झाल्याने अप्पर वैतरणातील साधारण ९१ हजार ३०० दशलक्ष लीटर तसेच ३७ हजार दशलक्ष लीटर अतिरिक्त राखीव पाणी शिल्लक झाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २० एप्रिलच्या आकडेवारीनुसार सात धरणांमध्ये तीन लाख २७ हजार २८९ दशलक्ष जलसाठा उपलब्ध आहे.

पाणीकपातीचा निर्णय कधी?

वाढत्या तापमाचा अंदाज घेता शिल्लक राहिलेल्या पाणीसाठ्यात बाष्पीभवनामुळे घट होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी धरणांतील शिल्लक पाणीसाठा आणि राखीव पाणीसाठा यांचे योग्य नियोजन करुन वापरावा लागणार आहे. मात्र येत्या मे महिन्यात धरणांतील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईकरांसाठी पाणीकपात करायची की नाही किंवा केली तर किती टक्के करायची,याबाबत मे महिन्यामध्ये योग्य निर्णय घेण्यात येणार आहे,असे जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai Dam Water Level Status
Mumbai News : महिलेसह दोघांवर चाकूने हल्ला; कारण ऐकून तळपायाची आग जाईल मस्तकात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com