Mumbai News: ब्रेकिंग! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; वर्षा गायकवाड यांच्यासह ६०-७० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Maharashtra Breaking News: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह १७ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Breaking News
Maharashtra Breaking NewsSaamtv

सचिन गाड, मुंबई|ता. ७ मार्च २०२४

Maharashtra Politics News:

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (६, मार्च) मंत्रालयाबहेर आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह १७ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढल्याबद्दल वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी मंत्रालयाबहेर आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह १७ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान सरकार आणि एस बी आय विरोधात घोषणाबाजी करणे तसेच जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच काल मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढल्याबद्दल काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राखी जाधव आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Breaking News
Nashik News : राज ठाकरेंचे बॅनर्स फाडले; नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातील प्रकार

वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्यासह एकूण ६०-७० आंदोलकांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना मोर्चा काढणे, जमावबंदी आदेशाच उल्लघन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेस तडा जाईल असे कृत्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

आज काँग्रेसची बैठक?

दरम्यान, 16 तारखेला राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल होत आहे, याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला के सी वेणुगोपाल यांच्यासह महाराष्ट्रातील बडे नेते उपस्थित असतील. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होणार असून त्यासाठी कोणत्या नेत्यांना आमंत्रित करायचं यासंदर्भात बैठकीत चर्चा होऊ शकते.

Maharashtra Breaking News
Crime News: खळबळजनक! नाशिकमध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या परप्रांतीय महिलेचा खून, भाचा गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com