
फैय्याज शेख
भिवंडी : भिवंडी Bhiwandi तालुक्यातील खारबाव Kharbao गावातील village तब्बल 70 एकर पेक्षा जास्त शेत Farm जमिनीच्या सात- बारावर पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांची farmers नावे महसूल विभागाने Department of Revenue कमी करून सावकाराची नावे लावल्याने भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे.
हे देखील पहा-
भिवंडी तालुक्यातील खारबाव या ठिकाणी शेतकरी मागील शंभर वर्षांपासून त्यांच्या ताब्यातील जमीन कसत असून, भाताचे rice उत्पन्न घेत आहेत. मात्र, त्यांच्या जमिनीच्या सातबारावर सावकाराचे नाव असताना, शेतकऱ्यांचे सुद्धा कुळ म्हणून नाव असताना देखील मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी न्यायालयीन Court लढाई लढत आहेत.
अचानक भिवंडीचे प्रांताधिकारी मोहन नळदकर यांची बदली झाल्याच्या पूर्व संध्येला शेतकऱ्यांची नावे वगळून फक्त सावकाराचे नाव ठेवण्याची ऑर्डर Order दिल्याने खारबाव गावातील शेतकरी भूमिहीन झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन आक्रोश आंदोलन केले आहे. यावेळी प्रांत अधिकारी यांच्या घरासमोर आत्मदहन Self immolation करण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.