कल्याण शहरात नवरात्रौत्सव काळात जड वाहनांवर बंदी लागू
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पोलिसांची कडक अंमलबजावणी
दुर्गाडी देवी दर्शनासाठी लाखो भाविकांच्या गर्दीचा विचार करून निर्णय
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रक, कंटेनर इत्यादी वाहनांना प्रवेशबंदी
वाहतूक कोंडीने त्रासलेल्या कल्याणकर नागरिकांना येणाऱ्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तात्पुरता दिलासा दिला आहे. कल्याणात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला वाहतूक पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी करत ही माहिती दिली आहे.
त्यानुसार येणाऱ्या सोमवारपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 पासून जड अवजड वाहनांना कल्याण शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सव काळामध्ये दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
परिणामी दुर्गाडी चौकातून गोविंदवाडी बायपास मार्गे पत्रीपुलाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येतो. ज्याचा ताण लालचौकी - सहजानंद चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावर येतो आणि कल्याणच्या या प्रमुख मार्गावर मोठी मोठ्या वाहन संख्येमुळे संपूर्ण पश्चिम शहराला वाहतूक कोंडीचा फटका बसतो.
गणेशोत्सव काळामध्ये झालेल्या वाहतूक कोंडीच्या यातना लाखो लोकांनी भोगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी घेतलेला हा मोठ्या वाहनांच्या बंदीचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. किमान नवरात्रोत्सव काळात तरी नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागणार नाही अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.