Farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ

आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंंत मदत मिळणार आहे.
Eknath shinde And Devendra fadnavis
Eknath shinde And Devendra fadnavisSaam TV

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) शासनाने मोठा दिलासा दिला आहे. नुकसान भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.

नव्या भरपाईनुसार, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी ६ हजार ८०० रुपयांऐवजी आता १३ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० ऐवजी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत. (Latest Marathi News)

तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी १८ हजार ऐवजी आता मिळणार ३६ हजार रुपये मिळणार आहेत. नुकसानीची मर्यादाही वाढवली. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंंत मदत मिळणार आहे.

राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे सोयाबिय, कापूस यासह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या या नुकसानीची वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 22232.45 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद पुरवणी मागण्याद्वारे करण्यात येईल. त्यानुसार हा निधी विभागीय आयुक्तांना किंवा शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com