मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित झाल्यानंतर आता काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांसोबत युतीची बोलणी सुरु केलीय.... मात्र वंचित आणि काँग्रेसची युती झाल्यास दलित आणि मुस्लीम मतं दुरावण्याची भीती असल्यानं ठाकरेसेना अस्वस्थ झालीय... त्यामुळे मुंबईत दुरावलेल्या काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी संजय राऊतांनी थेट राहुल गांधींना फोन करुन आघाडीसाठी गळ घातल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... तर आंबेडकरांसोबतच्या युतीचा 2 दिवसात फॉर्म्युला निश्चित करण्याचे संकेत काँग्रेसनं दिलेत.
खरंतर हिंदीसक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले.. त्यानंतर दोन्ही भावांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि युतीची खमंग चर्चाही रंगली... आता दोन्ही भाऊ एकत्र येत युतीची घोषणा करणार आहेत... मात्र राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी काँग्रेसनं विरोध करत एकला चलोचा नारा दिलेल्या काँग्रेसनं आता समविचारी पक्षांना सोबत घेत ठाकरेंसमोर आव्हान उभं करण्याची रणनीती आखलीय..
10 दिवसात काँग्रेसच्या नेत्यांनी 4 वेळा प्रकाश आंबेडकरांची भेट घेतलीय... या भेटीत जागावाटप, मुंबईतील प्रदूषण, नागरी सुविधा यासह स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...मात्र काँग्रेस आणि वंचितमुळे किती जागांवर ठाकरेंना फटका बसू शकतो?
मुंबईत काँग्रेसचं 18-20 टक्क्यांची व्होटबँक
वंचित बहुजन आघाडीचंही 3 टक्के मत
धारावी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, मुलुंडसह उपनगरातही वंचितची व्होटबॅक
काँग्रेस आणि वंचितमुळे ठाकरेंना 20 जागांवर फटका बसण्याची शक्यता
ठाकरेंनी बंधुप्रेमापोटी काँग्रेसची साथ सोडली... त्यामुळे ठाकरेंपुढं वंचित आणि काँग्रेस मोठं आव्हान उभं कऱण्याची शक्यता आहे.. याच कारणाने मुंबई महापालिकेची निवडणूक सत्तेची न राहता आता ठाकरेंसाठी अस्मितेसोबतच अस्तित्वाचीही बनणार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.