100 कोटी वसुली प्रकरण, चांदिवाल आयोगाची चौकशी पुर्ण; अवहाल राज्य सरकारला देणार

चांदीवाल आयोगाचे कामकाज पूर्ण झाले असून 22 मार्च रोजी हा अहवाल बनवून तो 23 मार्चला सीलबंद केला जाईल.
100 Crore Recovery Case
100 Crore Recovery CaseSaam Tv

मुंबई: शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगात सुनावणी पार पडली. मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर आज हजर झाले होते. आजच्या शेवटच्या सुनावणीनंतर आयोग आपला निर्णय सीलबंद लिफाफ्यात महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करणार आहे. चांदीवाल आयोगाची आज सुनावणी पूर्ण झाली आहे. चांदीवाल आयोगाचे कामकाज पूर्ण झाले असून 22 मार्च रोजी हा अहवाल बनवून तो 23 मार्चला सीलबंद केला जाईल. यानंतरहा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. अनिल देशमुखांशी संबंधित 100 कोटी वसुली प्रकरणाची चांदीवाल आयोगाने चौकशी केली आहे.

दरम्यान 100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अनेक दिवसांपासून कोठडीत आहेत. चांदिवाल आयोगाने अनिल देशमुश आणि सचिन वाझेंकडून चौकशी करुन अनेक धक्कादायक खुलासे केले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. 100 कोटी वसुलीचे प्रकरण चालू असतानाच अँटिलीया केस, मनसुख हिरेन हत्या अशा घटना घडत होत्या. परंतु आता चांदिवाल आयोगाने 100 कोटी वसुली प्रकरणात काय चौकशी केली आहे. ते त्यांनी दिलेल्या अहवालातूनच उघडकीस येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com