Vijay Wadettiwar : सेमिफायनल ते जिंकले, फायनल आम्ही जिंकू, काँग्रेसला विश्वास; तेलंगणाच्या विजयाची कारणेही सांगितली

Vijay Wadettiwar Latest News : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. सेमिफायनल ते जिंकले, फायनल आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Vijay Wadettiwar On assembly election results 2023
Vijay Wadettiwar On assembly election results 2023SAAM TV
Published On

Vijay Wadettiwar On assembly election results 2023 :

लोकसभा निवडणुकीची सेमिफायनल म्हणून समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील नेते प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. सेमिफायनल ते जिंकले, फायनल आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभेच्या निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत विजयी आघाडी मिळवली आहे. तर एकमेव तेलंगणात काँग्रेस विजयाच्या वाटेवर आहे, असे दिसते. या निकालांवर महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

 (Latest Marathi News)

खचून जाणार नाही...

मागच्या वेळी सेमिफायनल आम्ही जिंकलो; पण फायनल हरलो. तसेच आता सेमिफायनल ते जिंकले, फायनल आम्ही जिंकू, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रचंड मेहनत घेतली. आम्ही या पराभवाने खचून जाणार नाही. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत आणि लढत राहू, असंही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar On assembly election results 2023
Madhya Pradesh Assembly Election 2023 Results LIVE : मध्य प्रदेशमध्ये कोणी किती जागा जिंकल्या, वाचा एका क्लिकवर

तेलंगणातील विजयाचं कारण काय?

काँग्रेसने तेलंगणात विजयी आघाडी घेतली आहे. हा विजय नेमका कशामुळे मिळाला, यामागचं कारण वडेट्टीवार यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रेचा फायदा तेलंगणात झाला. राहुल गांधी यांनी चौदा दिवस तिथं यात्रा काढली. ही यात्राच मैलाचा दगड ठरली. मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला, असेही वडेट्टीवार म्हणाले.

तेलंगणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना तुरुंगात टाकलं होतं. मुलीच्या लग्नालाही सोडलं नव्हतं. हे जे काही सूडाचं राजकारण आहे, त्यामुळं तिथल्या लोकांचा राग होता. हे एक कारण आहे. तसेच राहुल आणि प्रियांका गांधींच्या सभांना तिथं प्रचंड प्रतिसाद मिळाला. पक्षानंही खूप मेहनत घेतली. त्यामुळे तेलंगणात हे यश मिळालं, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Vijay Wadettiwar On assembly election results 2023
Chhattisgarh Election Results: काँग्रेससमोर मोठं संकट, सत्ता तर गमावलीच; पण ११ मंत्रीही पराभवाच्या छायेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com