बीडमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या क्रूरतेची पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरु झालीय. कारण याचं वाल्मिक कराडनं आतापर्यंत 25 खून केल्याचा खळबळजनक दावा माजी पीएसआय रणजित कासलेनं केलाय...
दरम्यान आमदार सुरेश धसांच्या मागणीनंतर वाल्मिक कराडनं केलेल्या खूनांसंदर्भात एकत्रित एसआयटी स्थापन करण्यात आलीय. यापूर्वी बीडमध्ये DYSP राहिलेले आणि अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक असणाऱ्या पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. त्यामुळे कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आता वाल्मिक कराडभोवतीचा फास आणखी आवळला जाणार का? वाल्मिक कराडमुळे कुणाच्या अडचणी वाढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.