Ulhasnagar News : १०८ रुग्णवाहिकेचा गरिबांच्या आरोग्याशी खेळ; दुपारी कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका सायंकाळी दाखल, रुग्णाचा मृत्यू

Ulhasnagar : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालय शनिवारी दुपारी तीन वाजता १०८ रुग्णवाहिकेला कॉल केलेली रुग्णवाहिका सायंकाळी सात वाजता आल्याने एका सत्तर वर्ष वृद्ध महिलेचा मृत्यू झाला
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

अंबरनाथ : गरीब आणि गरजू रुग्णांसाठी शासनातर्फे १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली असली तरी ही रुग्ण सेवा आता रुग्णांच्या मृत्यूचा सापळा बनत असल्याचा अनुभव आला आहे. रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी दुपारी कॉल केल्यानंतर सायंकाळी रुग्णवाहिका दारात आली. तो पर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला होता. यामुळे रुग्णवाहिकेवर असलेले कर्मचारी रुग्णाच्या सेवेसाठी आहेत का? स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काम करतात? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालय शनिवारी १०८ रुग्णवाहिकेबाबत असा प्रकार घडला आहे. दुपारी तीन वाजता १०८ रुग्णवाहिकेला कॉल केलेली रुग्णवाहिका सायंकाळी सात वाजता आल्याने पब्बी थापा नावाच्या एका सत्तर वर्ष वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर काही सिंधी मुलांनी एक सात वर्षाच्या आदिवासी परिवारातील आकाश सचिन भोसले या मुलाला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. तो मुलगा निमोनिया आजारावर उपचार घेत असताना त्याची तब्येत जास्त झाल्याने त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले.  

Ulhasnagar News
Beed Crime News : मुकादमाच्या जाचाला कंटाळून ऊसतोड मजुराने घेतला गळफास; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दीड तासांच्या प्रयत्नानंतर आली रुग्णवाहिका 

कुटुंब कार्डिओ ॲम्बुलन्स करू शकत नसल्याने त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. एक- दीड तासाच्या प्रयत्नानंतर १०८ रुग्णवाहिका मध्यवर्ती रुग्णालयात आली. तेव्हा त्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी रुग्णाची परिस्थिती पाहून त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेड बुक करण्यासाठी सांगितले. तेव्हा बेड बुक नाही झाल्याने १०८ रुग्णवाहिका तिथून निघून गेली. अशा प्रकारांमुळे यापूर्वीही अनेक मृत्यू मध्यवर्ती रुग्णालयात झाले आहेत. 

Ulhasnagar News
Navi Mumbai Crime : जुगाराच्या नादात झाला कर्जबाजारी; पत्करला चोरीचा मार्ग, १८ रिक्षा चोरणारा अटकेत

रुग्णाच्या नातेवाईकांना येतात अडचणी 
१०८ रुग्णवाहिकेत असलेले वैद्यकीय अधिकारी प्रत्येक वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना पुढील रुग्णालयात बेड बुक करण्यासाठी सांगतात. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना बेड बुक करण्यासाठी कोणताही नंबर नसल्याने तसेच मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना येथील नंबर माहित नसल्याने रुग्ण मध्यवर्ती रुग्णालयात दगावत आहे. राज्य शासनाने गरीब आणि गरजू रुग्णांसाठी सुरू केलेली ही १०८ रुग्णवाहिका सेवा आता त्या रुग्णवाहिकेवर असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे मृत्यूचा सापळा बनत आहेत. 

रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार 

कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर बरोबर बोलत नाहीत, त्यांच्या मर्जीने ते निघून जातात, मात्र रुग्णांच्या जीवाचं बरं वाईट काय होतं हे पाहण्यासाठी ते थांबत नाहीत, फक्त आणि फक्त १०८ रुग्णवाहिकच्या कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार चालू असून आता १०८ रुग्णवाहिका सेवा ही रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावनेशी खेळण्यासाठी सुरू केली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत. माजी मुख्यमंत्री तसेच सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात हा प्रकार सुरू असून एकनाथ शिंदे या प्रश्नाकडे लक्ष देतील का? असा सवाल केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com