मनोज जरांगेंनी आरपारचा नारा देत आरक्षणासाठी एल्गार पुकारला... तब्बल 5 दिवसानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला आणि मराठा समाजालाने विजयोत्सव साजरा केला.. मात्र एकीकडे मराठा समाज विजयोत्सव सुरु करत असताना दुसरीकडे आरक्षणावर सकारात्मक तोडगा काढल्याने ठाकरेसेना फडणवीसांवर फिदा झालीय....
खरंतर ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सकारात्मक आहेत... मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आडकाठी आणत असल्याचा आरोप मनोज जरांगेंकडून केला होता... मात्र आरक्षणासाठी फडणवीसच पडद्यामागून सुत्रं हलवत होते.. आणि त्यामुळेच मंत्रीमंडळच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंनी थेट आरक्षणाचं श्रेय फडणवीसांना दिलंय...
वाशीत एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचा मसूदा देत जरांगेंची मनधरणी केली.. मात्र त्यानंतर रखडलेला प्रश्न अखेर फडणवीसांनी पुन्हा मार्गी लावला खरा..मात्.त्यामुळे अंतर्गत कुरघोडी करत महायुतीतील मराठ्यांचा मसिहा होण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकनाथ शिंदेंना फडणवीसांनी शह दिल्याची चर्चा आहे... त्यामुळेच शत्रूचा अप्रत्यक्ष शत्रू हा आपला मित्र या भूमिकेतून ठाकरेसेनेने फडणवीसांचं कौतूक केलंय की फडणवीसांच्या कौतूकामागे आगामी काळातील राजकारणाची बीजं रोवली गेली आहेत? याचीच उत्सुकता आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.