Sanjay Raut On Neelam Gorhe: ...अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो, नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊतांचा तोल सुटला

Neelam Gorhe Join Shinde Group: नीलम गोऱ्हेंच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.
Sanjay Raut On Neelam Gorhe
Sanjay Raut On Neelam GorheSaam Tv
Published On

Pandharpur News: शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शुक्रवारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये (Eknath Shinde Group) प्रवेश केला. नीलम गोऱ्हेंच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.

नीलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. 'काही महिन्यांसाठी आपले पद वाचवण्यासाठी नीलम गोऱ्हे पक्ष सोडून गेल्या. अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो.', अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केले आहे.

Sanjay Raut On Neelam Gorhe
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार? राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना सांगितले की, 'नीलम गोऱ्हे यांना ५ वेळा आमदार केले. त्यांना मिळालेले वैधानिक पद शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाले. असे सोडून गेल्याबद्दल लाज वाटते आणि महाराष्ट्राला सुद्धा नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल लाज वाटते. ४ ते ५ महिन्यांसाठी आपले पद वाचवण्यासाठी नीलम गोऱ्हे पक्ष सोडून गेल्या. अशा लोकांना आम्ही श्रद्धांजली वाहतो.' नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊतांचा तोल सुटला.

Sanjay Raut On Neelam Gorhe
Rahul Gandhi Rides Tractor: राहुल गांधी थेट शेताच्या बांधावर, पहाटे शेतात केली भात लावणी; ट्रॅक्टरही चालवला

संजय राऊतांनी पुढे सांगितले की, 'महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेच्या मनातील साकडे घालायला मी आलोय. राज्याची ओळख संतांची भूमी नसून आता गद्दारांची भूमी म्हणून ओळख होत आहे. त्यामुळे ही ओळख पुसण्याची पांडुरंग शक्ती देवो. यशवंतराव , अनेक मेहापुरुषांच्या नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्र आता गद्दार यांच्या नावाने ओळखला जातोय. हुकूमशाही , दडपशाही , पैशाचे राजकारण सुरू आहे. यासाठी सर्व घटकांनी एकत्र यावे.'

Sanjay Raut On Neelam Gorhe
Saamana Editorial: अजित पवार यांच्यावरील सर्व आरोप खोटे की खरे?; सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी सांगितले की, 'आम्ही राज ठाकरे यांच्याशी थेट बोलू शकतो. उद्धवसाहेब तर त्यांचे भाऊ आहेत. त्यामुळे पानसे किंवा कुणालाही मध्यस्थी करण्याची गरज नाही.

शिंदे गटात सहभागी झालेल्यांना संजय राऊत यांनी थेट चॅलेंज केले आहे. 'मी बाळासाहेब यांचा कार्यकर्ता आहे. मी बाजूला सरकतो. येणार आहेत का ४० आमदार परत?', असा सवाल त्यांनी केला आहे. 'मलाही पक्ष सोडता आला असता. मी तुरुंगात गेलो होतो. पण पक्षाने मला खूप दिले आहे. भाजपच्या तंबूत जाऊन टिकणे सोपे नाही. शिवसेना २५ वर्षे राहिली आणि टिकली. बाकीच्यांचे अवघड आहे. मला पक्षाने पाठवले म्हणून मी राज्यसभेवर जातोय. मिंधे गटाचे आमदार हे पैशाने विकले गेले आहेत., ', अशी टीका त्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com