
मस्कर, साम प्रतिनिधी
राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा निघाला, पॉडकास्टवरच्या मुलाखतीतून राज ठाकरेंनी साद दिली, उद्धव ठाकरेंनीही त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा थेट देशपातळीवर सुरू झाली. या चर्चा सुरू असताना राज ठाकरे मात्र परदेशात होते आणि त्यापाठोपाठ उध्दव ठाकरेही कुटुंबासमवेत परदेशवारीवर गेले. त्याआधीच राज ठाकरेंनी 29 एप्रिलपर्यंत कार्यकर्त्यांना युतीबाबत चर्चा करू नका, असे आदेश दिलेत आणि संजय राऊतांनीही त्याचीच री ओढली.
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा परदेशात होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही 2009 ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती. त्यावेळी ठाकरे बंधू परदेशात युतीच्या चर्चेसाठी गेले होते. त्यावेळी पडद्याआड नेमक्या काय घडामोडी घडल्या होत्या सांगतायत सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक निलेश खऱे
हिंदी विरोधासाठी आणि मराठीच्या आग्रहासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात. मात्र राज्याच्या हितासाठी,मराठीच्या कल्याणासाठी आणि ब्रँड ठाकरे जपण्यासाठी तसंच ठाकरेंच्या पुढच्या पिढीच्या राजकीय भविष्यासाठी ठाकरे बंधू सूत जुळवणार की पुन्हा केवळ राजकीय कंड्या पिकवून युतीच्या चर्चा थंडं बस्त्यात जाणार हेच पाहायचं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.