केंद्रासह राज्य सरकार आणि साखर कारखानदार एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचा घाट घालताहेत. त्यांच्या या प्रयत्नांस आमचा विरोध राहील असे राजू शेट्टी यांनी नमूद केले.
काेल्हापूर : एफआरपी तीन तुकडे करण्याविरोधात आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. घटस्थापना दिवशी दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेऊन जागर आराधना शक्तिपीठांची अशी यात्रा सुरू करणार आहे. येथे दसऱ्या दिवशी समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एफआरपीचे तुकडे करण्याच्या षडयंत्रांची माहिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. swabhimani-shetkari-sanghatna-raju-shetti-addressed-media-on-sugarcane-frp-kolhapur-marathi-news-sml80
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० व्या ऊस परिषदेचे घोषणा आज राजू शेट्टी यांनी येथे केली. ही ऊस परिषद १९ ऑक्टोबरला जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर दुपारी एक वाजता हाेईल. ही ऊस परिषद आतापर्यंतची परिषदेपेक्षा उच्चांकी असेल असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान पूरग्रस्त भागातील जनतेस अद्याप भरपाई मिळालेली नाही. ही भरपाई तातडीने न मिळाल्यास राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.