
संजय सुर्यवंशी, साम टीव्ही प्रतिनिधी
शेतकरी हा आपल्या शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतो. शेतीत अनेकदा प्रयोग केल्यावर शेतकऱ्यांना तोटा झाला आहे. परंतु नांदेडच्या एका शेतकऱ्याने १ एकर शेतीतून अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. मिरचीच्या पिकातून त्यांनी हा नफा मिळवला आहे.
पारंपरिक शेती सोबतच अनेक शेतकरी हे भाजी-पाला शेतीकडे वळले आहेत. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोन या गावाच्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेती पैकी एका एकर शेतीमध्ये हिरव्या मिरचीची लागवड केलीय. देवाजी भिसे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. भिसे हे मागील तीन वर्षांपासून आपल्या शेतीत मिरचीचे उत्पादन घेत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका तसा बागायतदार तालुका म्हणून ओळखला जातो. केळी हे पीक या तालुक्यातील मुख्य पीक आहे. परंतु केळीवर वेळोवेळी येणारं अस्मानी संकट त्यामुळे या तालुक्यातील अनेक शेतकरी आता नगदी पिकाकडे वळले आहेत. भाजी-पाला हे नगदी पीक असल्याने अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा भर सध्या भाजी-पाला लागवडी कडे वळल्याचे दिसत आहे.
अर्धापूर तालुक्यातील लोन या गावाच्या तरुण शेतकऱ्याने भाजी-पाला शेतीतून आपली आणि आपल्या परिवाराची आर्थिक उन्नती केली आहे. भिसे यांच्या एकूण पाच एकर शेती पैकी एका एकर मध्ये हिरवी मिरची आहे.सध्या ही मिरची तोडणीला आलीय.एका एकर मध्ये मिरची लागवडीसाठी भिसे यांना केवळ 55 हजार रुपये खर्च आला.
55 हजार रुपये खर्च वगळता अडीच लाखांचे उत्पन्न भिसे यांना मिळाले आहे. मिरची तोडणी सुरु असून अजून या मिर्चीतून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्याला आहे.भिसे यांच्या या हिरव्या आणि तिखट मिरचीने त्यांच्या संसारात गोडवा निर्माण केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.