दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून जात असून, हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत वाया जात असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे तीन एकर क्षेत्रावर लागवड केलेले सोयाबीनचे पीक पावसाअभावी पूर्णपणे वाळून गेले आहे. पावसाची प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी पीक वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र पाऊस न झाल्याने अखेर उभे पीक करपून गेले. गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस न पडल्याने तालुक्यातील अनेक भागांत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.