'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्यांना, मी येऊ दिलं नाही; पवारांचा फडणवीसांना टोला

सत्तेसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही महाविकास आघाडी काम करत आहे.
Sharad Pawar/Devendra Fadanvis
Sharad Pawar/Devendra FadanvisSaam TV
Published On

उस्मानाबाद :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत यावेळी कार्यक्रमात बोलताना पवारांनी विविध मुद्यावर भाष्य करत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. काहीजण निकालाआधी मी येणार असं सांगत होते, मात्र त्यांना मी येऊ दिल नाही, असा टोला त्यांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) लगावला.

Sharad Pawar/Devendra Fadanvis
आम्ही ST विलीकरणाच्या पाठीशी, 2024 ला काँग्रेस विलीनीकरणाची भूमिका मांडेल - नाना पटोले

पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे. शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रीत करून स्वराज्य उभं केलं, देशात अनेक राज्य झाली, कुठे मोगल झाले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com