सांगली : यंदा चांगला पाऊस झाल्याने पाण्याची समस्या मिटली आहे. शक्यतोवर पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता धूसर आहे. मात्र ऐन दिवाळीतच सांगली शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. महापालिका प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे नागरिकांचे दिवाळीच्या पहिल्या दिवशीच मोठा खोळंबा झाला. परिणामी नागरिक संतप्त झाले आहेत.
सांगली महापालिकेकडून शहरात करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवसात हा पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाणी आणण्यासाठी इतरत्र जावे लागत आहे. दरम्यान पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी नागरीकांसह थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरलं.
हातात हंडे, घागर घेऊन आंदोलन
संतप्त झालेल्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या दारातच हंडे आणि घागर घेऊन धरणे आंदोलन देखील केलं. यावेळी महापालिका आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच महापालिकेकडून शहरात पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचा आरोप करत तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.
मनमाड शहराला ४ दिवसानी पाणी पुरवठा
मनमाड : नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण मागिल महिन्यापासून भरुन वाहत असून धरणाच्या सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असल्याने मनमाड शहराला १० ते १२ दिवसांनी होणारा पाणी पुरवठा आता ४ दिवसांनी होत असल्याने मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. तरी पाणी केवळ एक तास येत असल्याने पाणी पुर्ण क्षमतेने नागरीकांना भरता येत नसल्याच्या तक्रारी येत आहे. दरम्यान सध्या धरण भरले असले तरी पुढील काही महिन्यात उन्हाळा सुरु झाल्या नंतर पाणी पुरवठ्यात किती दिवसांची वाढ होईल याची चिंता लागून राहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.