Ramdas Athawale: संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर; मंत्री रामदास आठवले

संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर; केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam tv

सांगली : खासदार संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही. राज्य सरकार खंबीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार २०२४ पर्यन्त कार्यकाळ पूर्ण करून २०२४ ला परत आमची सत्ता येणार आहे. असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. (Maharashtra News)

Ramdas Athawale
Eknath Khadse: सरकारमधील प्रत्येकाच्‍या गुडघ्याला बाशिंग; आमदार एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

सांगलीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री आठवले (Ramdas Athawale) बोलत होते. छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आहे. त्यानिमित्त ५ आणि ६ मे २०२३ ला (Kolhapur) कोल्हापूरला आरपीआयचे अधिवेशन आयोजित केले आहे. ६ तारखेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या आघाडीचा काही उपयोग नाही

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले. तर फार परिणाम होणार नाही. कारण भीम शक्ती माझ्याकडे आहे. शिंदे यांचे मोठे बंड आहे. शिवय उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात जागा वाटपामध्ये मतभेद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही.

अगोदर कॉंग्रेस जोडा

राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही, तर तोडण्याची यात्रा आहे. पहिले काँग्रेस जोडा. राहुल गांधी पंतप्रधान होणे अशक्य आहे; असा टोलाही मंत्री आठवले यांनी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com