Sharad Pawar: 'आरक्षण कायद्यात दुरुस्ती करावी, आम्ही केंद्र सरकारला पाठिंबा देऊ...' शरद पवारांचे सर्वात मोठे विधान

Sharad Pawar On Assembly Election 2024: कॅन्सर हॉस्पिटलमधील शासकीय अर्थसहाय्य थांबले आहे. हे वैद्यकीय क्षेत्राचे उदाहरण आहे. अशा अनेक योजनांचे पैसे थांबले आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला.
Sharad Pawar: 'आरक्षण ५० टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांपर्यंत जाऊ द्या', शरद पवारांचे सर्वात मोठे विधान
Sharad Pawar Sangli Visit: Saamtv
Published On

Sharad Pawar Sangli Visit: मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे,दुरुस्ती करायला काय हरकत नाही, असे सर्वात महत्वाचे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. सांगलीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी आरक्षणावरुनही एक महत्वाचे विधान केले.

काय म्हणाले शरद पवार?

"मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे,दुरुस्ती करायला काय हरकत नाही, 50 टक्केच 75 टक्क्यांवर जायला पाहिजे, तमिळनाडूमध्ये 78% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात 75% वर का होऊ शकत नाही. 75 टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही," असे शरद पवार म्हणाले.

"सरकारने लाडकी बहीण योजना काढली त्याचे सर्वांना स्वागत करावे लागले, पण तेवढ्यात भागात नाही. एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका आहे. मुलींवर वाढलेले अत्याचार हे गंभीर आहे. लाडक्या लेकीला अर्थसहाय्य करायचं दुसरीकडे तिच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करायचे सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे अर्थसहाय्य थांबले आहे. कॅन्सर हॉस्पिटलमधील शासकीय अर्थसहाय्य थांबले आहे. हे वैद्यकीय क्षेत्राचे उदाहरण आहे. अशा अनेक योजनांचे पैसे थांबले आहेत," असा आरोप शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar: 'आरक्षण ५० टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांपर्यंत जाऊ द्या', शरद पवारांचे सर्वात मोठे विधान
Maharashtra Politics: आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची ऑफर, अजित पवार गटात अस्वस्थता; शिंदेसेनेला झुकते माप

अमित शहांवर निशाणा..

"आज जे महाराष्ट्रात घडत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. सामाजिक सलोखा राखून सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे. अमित शहा सध्या काहीही बोलत असतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा, पक्ष फोडा. ते कायदा व सुव्यवस्था कोठे नेऊन ठेवतात? देशाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे, ते नेते अशी भाषा करतात. येत्या दीड महिन्यात याबाबत निकाल लावू," असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

छत्रपती संभाजी राजे, राजू शेट्टी एकत्रित आले तर परिणाम होणारच. आम्ही खूप अस्वस्थ झालोय आमच्या झोपा उडाल्या आहेत. पंतप्रधानांच्या राज्यात १८ सभा झाल्या आणि १४ ठिकाणी पराभव झाला त्यामुळे आमची विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रात जास्त सभा घ्याव्यात, असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.

Sharad Pawar: 'आरक्षण ५० टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांपर्यंत जाऊ द्या', शरद पवारांचे सर्वात मोठे विधान
Accident News: पालकमंत्र्यांच्या गाडीची टेम्पोला धडक, अपघातानंतर वाहन उलटले; चालक गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com