
रत्नागिरीमध्ये भीषण अपघातामध्ये उच्चशिक्षित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे रत्नागिरीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर काम करणाऱ्या इगल इन्फ्रा कंपनीच्या पाण्याच्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रत्नागिरीतल्या हातखंबा इथे रात्री हा अपघात झाला. या अपघातामध्ये शिशिर रावणंग या ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
शिशिर रावणंग हा तरुण रत्नागिरीतल्या निवळी या गावामध्ये राहणारा होता. घराच्या दिशेने येत असताना ही अपघाताची घटना घडली. तरुणाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच निवळी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.