Sourabh Malushte News : रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी भूजल पातळी खाली गेल्यामुळे अनेक विहरी, पाणवठे कोरडे झाले आहेत. बहुतांश भागात टँकरेने पाणीपुरवठा सुरु आहे. रत्नागिरी (ratnagiri) शहरात देखील नागरिकांना एकदिवसा आड पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरीकांचे पाण्यावीना सध्या हाल होताहेत. (Maharashtra News)
या परिस्थितीत सामाजिक भान म्हणून शहरातील सौरभ मलुष्टे (sourabh malushte) हा जलदूत बनून रत्नागिरीकरांसाठी पुढे आला आहे. साैरभने 5 मे पासून शहरातल्या विविध सोसायटींना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
त्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून टँकर शहरभर फिरत असताे. या उपक्रमातून दिवसाला सुमारे 15 ते 20 टँकर पाणीपूरवठा हाेता. आत्तापर्यंत जवळपास 10 लाख लिटर पाणी रत्नागिरीकरांना विनामुल्य साैरभकडून पूरविले गेले आहे. पाऊस सुरु हाेईपर्यंत हा उपक्रम चालू राहणार असल्याचे सौरभ मलुष्टे याने साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.
या उपक्रमाबाबत साैरभ म्हणाला रत्नागिरी शहरातील जवळपास 70 हून अधिक सोसायटींना एक दिवस आड मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ज्यांना पाण्याची गरज आहे अशांची तहान भागवली जातेय. रत्नागिरी शहरात विकत देखील जिथे टॅंकर मिळत नाही तिथे आम्ही पाेहचताे. जवळपास सहा हजार लोकांची तहान या उपक्रमाच्या माध्यमातून भागवली आहे.
दरम्यान साैरभ याच्या उपक्रमाचे नागरिकांकडून काैतुक हाेत आहे. या उपक्रमामुळे पाण्याची चिंता मिटल्याचे साम टीव्हीशी बाेलताना शमिका पाटील यांनी नमूद केले.
वाढते शहरीकरण आणि त्यामुळे होणारी वृक्षतोड परिणामी जलसाठे नष्ट होऊ लागलेत. त्यामुळे शहरी भागातील नागरीकांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. भुजल पातळी खाली गेल्यानं मर्यादीत पाणीपुरवठा केला जातोय. पाणीटंचाईची समस्या भेडसावणा-या रत्नागिरीकरांसाठी सौरभ मलुष्टे यांसारखे जलदूत पुढे येण गरजेचे आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.