Raju Shetti
Raju Shetti

शेतकरी विरोधी सरकारला गुडघे टेकायला लावू : राजू शेट्टी

Summary

उत्पादन पेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकला जात आहे. तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर आणि बँकांचा तगादा यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे असेही राजू शेट्टींनी नमूद केले.

सांगली : एक रकमी एफआरपी वर आम्ही ठाम आहाेत. परंतु केंद्र सरकारने एफआरपी frp तीन तुकड्यात देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर कळस म्हणजे राज्य सरकार वर्षभरात तीन तुकड्यात एफआरपी देऊ असे म्हणत आहे. खरं तर ही दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहेत. आम्ही यांना गुडघे टेकायला लावू असा इशारा देत एक रकमी एफआरपी घेऊ असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetti यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला. सांगली येथे आज एका शेती विषयक कंपनीच्या उदघाटनास शेट्टी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Raju Shetti
भवानीपूरात ममता बॅनर्जींची 'दीदीगिरी'; विक्रमी मतांनी विजय

शेट्टी म्हणाले सव्वा दोन महिने उलटून गेले अद्यापही पूरग्रस्तांना सरकारने मदत दिली नाही. आता केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येणार आहे. मला कळत नाही आता येऊन हे पथक काय पाहणार आहे. या सर्व गाेष्टीवरून कळते केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या विषयी किती तळमळ आहे.

राज्य सरकारची अद्यापही काही ठिकाणी मदत पोहचली नाही. आम्ही यासाठी जल समाधी आंदोलन सुद्धा केले. अजून काय करायचे तेव्हा सरकार मदत करणार असा प्रश्न शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळाली नाही तर महाविकास आघाडीतील नेत्यांची दिवाळी गाेड लागू देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला. 

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com