सचिन कदम
रायगड : प्रत्येक मंदीरात लाडूचा प्रसाद देण्याची प्रथा आहे. यात बदल करीत अष्टविनायक गणपती पैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात चिक्कीचा प्रसाद देण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चिक्कीचा प्रसाद देण्याचा निर्णय घेत संकष्ट चतुर्थीपासून याची सुरवात करण्यात आली आहे.
अष्टविनायक मंदिरापैकी एक मंदिर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात बल्लाळेश्वर पाली येथे आहे. अष्टविनायक दर्शन करत रोज शेकडो- हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भाविकांची अधिक गर्दी होत असते. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला गणरायाचा आवडणाऱ्या खाद्यापैकी एक असलेले लाडू प्रसादात दिला जात होता. मात्र मंदिर देवस्थान ट्रस्टने यात बदल करण्याचा निर्णय घेतला असून आता लाडू ऐवजी चिक्की देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणरायाला अर्पण केलेल्या नारळाची चिक्की
बाप्पाच्या दर्शनासाठी रोज शेकडो- हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक हे गणरायाच्या चरणी शेकडो नारळ अर्पण करतात. या नारळांचा वापर प्रसादासाठी चिक्की बनवण्यासाठी केला जाणार आहे. देवस्थान कमिटीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून संकष्टी चतुर्थीला या प्रसाद रूपी चिक्की वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
३० रुपयाचे असणार पाकीट
भाविकांनी गणरायाला अर्पण केलेल्या नारळांचा वापर करून चिक्की बनवली जाणार आहे. चिक्की बनविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राहणार आहे. सदर नारळाची चिक्की हि बंद पाकिटात राहणार असून ३० रुपये किंमतीचे हे प्रसाद चिक्कीचे पॅकेट असून हि चिक्की उपवासात असणारे भाविक खावू शकतील अशी बनविण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.