
रायगड : रायगड जिल्ह्यातून एक मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे, अलिबाग जवळच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे. मांडवा जेट्टी शेजारी ही मोठी दुर्घटना टळली आहे. बोटीमध्ये छिद्र पडल्याने त्यात पाणी शिरायला सुरुवात झाली होती. त्यावेळी बोटीमध्ये तब्बल १३० प्रवासी होते. मात्र, प्रसंगावधान राखत १३० प्रवाशांना सुरक्षित दुसऱ्या बोटीत हलवण्यात आलं, आणि मोठी दुर्घटना टळली. संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यादरम्यान, मांडवा सागरी पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
अलिबाग तालुक्यातील साखर समुद्रकिनाऱ्यावर मच्छीमारी करण्यासाठी ही बोट गेली होती, याचवेळी बिघाड झाल्याने अचानक गळती लागली व बोट पाण्यात बुडाली. बोटीमध्ये एकूण १५ खलाशी होती. या दुर्घटनेचे साक्षीदार असलेले जनार्दन नाखवा यांनी बोट दुर्घटनेबद्दल माहिती दिली होती. बुडालेल्या बोटीला दुसऱ्या बोटीने समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आले. बोटीमधील सर्व सामान खराब झाले होते. तसेच काही सामान वाहून गेल्याने बोट मालकाचे आणि खलाशांचे सुमारे १२ लाखांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर त्या बोटीतील पाणी काढण्याचे काम पंपाने केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.