
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदार यादीत ५ महिन्यात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही बुथवर २० ते ५० टक्क्यांनी मतदार वाढले आहे. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची बीएलओची तक्रार होती. न्यूज लाँड्रिंगच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधींनी हे गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग गप्प का? ही एका अर्थी चोरीच आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
राहुल गांधी यांनी न्यूज लाँड्रिंगच्या बातमीचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात मतदार यादीत फक्त ५ महिन्यांत ८ टक्के वाढ झाली. काही बूथवर २० ते ५० टक्के वाढ झाली. बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची माहिती दिली होती. माध्यमांनी पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले. निवडणूक आयोग गप्प का?.'
राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की,'हे काही वेगळे दोष नाहीत. ही मत चोरी आहे. कबुलीजबाब म्हणजे कबुलीजबाब. म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो.' राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुजेट प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.
न्यूज लाँड्रिंगने दिलेल्या वृत्तानुसार, ६ महिन्यांत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात २९,२१९ मतदारांची भर पडली. मतदान कर्मचाऱ्यांचा दावा आहे की मतदारांची संख्या कमी आहे. दररोज सुमारे १६२ मतदार आहेत. ही ८.२५ टक्के वाढ आहे. जी निवडणूक आयोगाच्या स्वतःच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य पडताळणी तपासणी सुरू करणाऱ्या ४ टक्के मर्यादेच्या दुप्पट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.