pm kisan beneficiaries should complete e kyc appeals yavatmal administration
pm kisan beneficiaries should complete e kyc appeals yavatmal administrationSaam Digital

Yavatmal : शेतकऱ्यांनी ई-केवायसी का केली पाहिजे? 47 हजार शेतक-यांना यवतमाळ जिल्हाधिका-यांनी केले 'हे' आवाहन

यवतमाळ जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोंबर 2021, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022, जुन, जुलै 2023 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

- संजय राठाेड

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे नुकसानीची रक्कम जमा केली जाते. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 47 हजार शेतक-यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी केली नसल्याने त्यांच्या रक्कम जमा करण्यात प्रशासनाला माेठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. (Maharashtra News)

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी यासाठी ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोंबर 2021, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022, जुन, जुलै 2023 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

pm kisan beneficiaries should complete e kyc appeals yavatmal administration
अकोल्यात तिसरी दुर्दैवी घटना, कूलरचा शॉक लागून युवकाचा मृत्यू, कुटुंब शाेकसागरात

शेतकऱ्यांना नुकसानीची मदत तत्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 2 लाख 75 हजार 739 बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आतापर्यंत शासन स्तरावरून डीबीटीद्वारे 3 लाख 24 हजार 749 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 229 कोटी 58 लाख 19 हजार इतका निधी जमा करण्यात आलेला आहे. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बॅक खात्‍याशी लिंक नसणे, आधार प्रमाणिकरण, ई-केवायशी केली नसल्यामुळे अजूनही 47 हजार 675 बाधीत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी शासन स्तरावरून वितरीत करता आलेला नाही.

त्यामुळे तालुका कार्यालय, तलाठी यांच्याकडून व्हीके नंबर प्राप्त करून बाधित शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण, ई-केवायशी करावे. त्यानंतर शासनस्तरावरून मदत थेट बॅक खात्यात जमा करण्‍यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

pm kisan beneficiaries should complete e kyc appeals yavatmal administration
Unseasonal Rain Hits Washim: अवकाळी पावसाचा शेतक-यांना फटका, वाशिम जिल्ह्यात 7 हजार 780 हेक्टर पिकांचे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com