Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

Pandharpur News : राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. परंतु यंदा हे साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत.
Sugar Factory
Sugar FactorySaam tv

पंढरपूर : यावर्षी तीव्र उन्हाळा आणि त्यातच उजनीचे चुकलेले पाणी नियोजन यामुळे सोलापूर जिल्ह्यात ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे. परिणामी यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांवर देखील मोठे संकट निर्माण झाले आहे.

Sugar Factory
Railway Crime : मनमाडला रेल्वे वॅगनमधुन इंधन चोरी; सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. परंतु यंदा हे साखर कारखाने (Sugar Factory) अडचणीत सापडले आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाला होता. त्यामुळे उजनी धरण ७० टक्के भरले होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फटका ऊस शेतीला बसला आहे. पाण्याची समस्या सर्वदूर असल्याने शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात देखील पाणी टंचाई जाणवत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे.  

Sugar Factory
Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

सध्या तीव्र पाणी टंचाईमुळे पंढरपूर (Pandharpur) परिसरातील ऊस पिके पाण्याअभावी फडातच जळून गेली आहेत. तसेच टनाला ३ हजार भाव घेणारा ऊस सध्या वैरणीला ५०० रूपये गुंट्यानुसार विकला जात आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने साखर पट्यातील शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त आहे. ऊस कमी झाल्याने अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत.‌

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com