Samruddhi Mahamarag : समृद्धी महामार्गावरून 37 वाहनांना नो एन्ट्री; नेमकं कारण काय?

Samruddhi Mahamarag Accident : 100 दिवसात जवळपास 900 पेक्षा जास्त अपघात
Samruddhi Mahamarag
Samruddhi MahamaragSaam Tv

Samruddhi Mahamarag Rules : समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना टायर तपासून जा आणि वेगावर नियंत्रण ठेवा. कारण समृद्धीवरून प्रवास करण्यासाठी वाहनांचे टायर योग्य नसल्याकारणाने सोमवारी एकाच दिवसात 22 वाहनांना समृद्धीवरून परत पाठवले.

तर आज सकाळी 11 वाजेपर्यंत 15 वाहनांना समृद्धीवरून परत पाठवण्यात आले आहे. सदर वाहन तपासणी सुरु असताना वाहनाचे टायर पूर्णपणे वोर्न आऊट झालेले आढळून आले. त्या कारणामुळे सदर वाहनाला समृद्धीवरून परत पाठवण्यात आले. (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarag
Viral Video : ''टाटा, बाय-बाय, खत्म...'' कॅमेऱ्यात कैद झाला विचित्र अपघात; व्हिडिओच्या नादात तरुणी थेट कारला धडकली अन्...

वैजापूर नागपूर (Nagpur) टायर पूर्णपणे वोर्न आऊट झालेले आढळून आले. त्यामुळे पूजा कुचे आणि शिवशंकर धोंडे यांनी सदर वाहनास परत जाण्यास सांगितले. तर दुसरीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) वेरूळ टोल प्लाजा येथे, टायर तपासणी करत असताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक वैष्णवी कांबळे आणि अरुणा लहामगे यांनी वाहन परत पाठवले.

सावंगी - मुंबई एन्ट्रीवर देखील वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये पॅसेन्जर सीट बेल्ट आढळुन आले नाही. त्याकरणाने वाहन परत पाठवले. यावेळी समोवानी राजश्री सोळके समोवानी शिवाजी पुंगळे उपस्थित होत्या. तर सावंगी नागपूर एंट्री वर टायरची तपासणी करताना कांचन जाधव आणि मकरंद जायभाये उपस्थित होत्या.

या वाहनांना समृध्दी महामार्गावरून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलीय. समृद्धी महामार्गावरील अपघाताची (Accident) संख्या कमी करण्यासाठी आरटीओकडून सोमवारपासून वाहनांच्या तपासणीला सुरुवात झालीय. आज सकाळपासून पुन्हा वाहनांची तपासणी करून कारवाई सुरु झालीय.

Samruddhi Mahamarag
Swabhimani Shetkari Sanghatana News : ...अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; 'स्वाभिमानी'चा सरकारला इशारा

सोमवारी पहिल्याच दिवशी दिवसभरात छत्रपती संभाजीनगर आरटीओने चार ठिकाणी सोमवारी 208 वाहने आणि आज सकाळी 97 वाहने तपासली. त्या तपासणीत टावर घासलेले, विना सीटबेल्ट सुसाट वाहने पळवत असल्याचे दिसून आले. या तपासणीत 37 अनफिट वाहने ही समृद्धीवरून प्रवास करण्यासाठी अनफिट असल्यानं त्यांना परत पाठवण्यात आले.

वेगावर नियंत्रण नसल्याने आणि टायरची स्थिती वाईट असल्याने महामार्ग वाहनांसाठी खुला केल्यापासून पहिल्या 100 दिवसात जवळपास 900 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. या अपघतात शेकडो जणांचे बळी गेले आहेत. ते अपघात कमी करण्यासाठी आता आरटीओने प्रत्येक जिल्ह्यात तपासणी मोहीम कालपासून सुरू केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com