
नवी मुंबई : नवी मुंबईतील महापालिकेच्या शाळेच्या पिकनिकसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा काल मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील मनपा शाळा क्रमांक ७६ची पिकनिक काल खोपोली येथील इमॅजिका येथे गेली होती. या सहलीमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आयुषला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दरम्यान, आयुषचा मृत्यू कशामुळे झाला? याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. १३ वर्षीय आयुष सिंग याचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, खोपोली येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. वॉटर पार्कमध्ये इतर मुलांसोबत राईड खेळून झाल्यानंतर हा मुलगा थकला होता, त्यानंतर त्याला अचानक उलट्या सुरू झाल्या. स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात पाठवण्याचा प्रयत्न केला गेला, पण वाटेमध्येच मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली होती पण आयुषचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.