नाशिकच्या इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. इगतपुरीजवळच्या भावली धरणामध्ये बुडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह धरणाच्या बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण आणि तरुणी हे रिक्षाने आज दुपारी इगतपुरी येथील भावली धरणावर फिरण्यासाठी आले होते. धरणामध्ये उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून त्यांचा मृत्यू झाला. मृत तरुण आणि तरुणी नाशिकच्या जेलरोड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी इगतपुरी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
अनस खान दिलदार खान (15 वर्षे), नाझिया इमरान खान (15 वर्षे), मीजबाह दिलदार खान (16 वर्षे ), हनीफ अहमद शेख (24 वर्षे) आणि ईकरा दिलदार खान (14 वर्षे) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींची नावं आहेत. यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. खान आणि शेख कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.