
सागर निकवाडे
नंदूरबार : आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. यात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर (Navapur) शहरात सकाळी आठ वाजता सुमारास जोरदार अवकाळी पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. (Breaking Marathi News)
हवामान विभागाच्यावतीने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. कुठे गारपीट तर कुठे मुसळधार पाऊस होत असल्याने बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या झालेले नुकसानीची भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकरी (farmer) नाराज असल्याचे चित्र देखील आहे. लवकर नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पावसाच्या थैमानात नुकसान
अर्धा तास पडलेल्या पावसामुळे नवापूर शहरातील रंगावली नदी किनारी असलेल्या वीट भट्टीधारांचे नुकसान झाले आहे. तर बळीराजा देखील या अवकाळी पावसाने हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कंबर्ड मोडल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.