सागर निकवाडे
नंदूरबार : मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात कांद्या विक्रीसाठी मोठी अडचण होती. यामुळे कांदा (Onion) विक्रीसाठी आता स्वतंत्र नवीन बाजारपेठ तयार करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. (Live Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जात असते. मात्र नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र कांदा विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत असते. त्यामुळे आता बाजार समितीने निर्णय घेण्यात आला आहे. कांदा विक्रीसाठी नवीन बाजारपेठ तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी फक्त कांद्याच्या लिलाव होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) याच्या मोठा फायदा होणार आहे.
बाहेरगावी जावून व्हायची विक्री
जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी स्वातंत्र्य मार्केट नसल्यामुळे अनेक शेतकरी बाहेरगावी जाऊन कांदा विक्री करत होते. त्यामुळे त्यांना परवडत नव्हते. मात्र आता नंदुरबार जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळणार असल्याने दोन पैसे शेतकऱ्यांचे वाचणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.