Nandurbar: वीज पडून चार शेतकऱ्यांच्या 16 बकऱ्या ठार

वीज पडून चार शेतकऱ्यांच्या 16 बकऱ्या ठार
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv

नंदुरबार : सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ गावातील चार शेतकऱ्यांच्या (Farmer) बकऱ्यांवर विज पडल्याने 16 बकऱ्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (Nandurbar News Lightning Strike)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये परतीच्या पावसाचे (Rain) चित्र पहावयास मिळत आहे. या दरम्‍यान डोंगरदऱ्यात बकऱ्या चारायला गेलेल्या बकऱ्यांवर विज (Lightning Strike) पडल्याने तब्बल 16 बकऱ्या ठार झाल्या आहे. खुर्चीमाळ येथील रहिवासी देवजी हांद्या नाईक यांच्या ७ बकऱ्या, सायसिंग चांद्या नाईक १ बकरी, काल्ला सूरजी नाईक यांच्या ५ बकऱ्या, तर चांद्या टेंबऱ्या नाईक यांच्या ३ अशा एकूण १६ बकऱ्या ठार झाल्या आहेत. तलाठी रोहित पाडवी, गावकरी लकी भाऊ नाईक, पोलीस पाटील लक्ष्मण माकत्या नाईक व गावकरी यांच्या उपस्थितीत महसूल विभागाने पंचनामे केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई लवकर द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com