संजय सूर्यवंशी
नांदेड : मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाने थैमान घातले आहे. रात्रीपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.
नांदेड व वाशीम जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असताना नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी काही रहदारीचे मार्ग देखील बंद झाले आहेत.
अनेक गावांचा संपर्क तुटला
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना मोठा पूर आला. नायगाव मुखेड, धर्माबाद, देगलूर, बिलोली या तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटला आहे. शेतीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. पुराचे पाणी नांदेड- हैदराबाद महामार्गावर आल्याने या महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे.
लेंडी धरणाचे सर्वच दरवाजे उघडले
काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. नांदेडसह लातूर आणि बिदर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे लेंडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने लेंडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाच्या सर्वच दरवाज्यातून लेंडी नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लेंडी नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.