>>चेतन इंगळे, वसई
Mumbai News: वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सौरभ पाल आणि रोशन गावडे अशी दोन्ही तरुणांची नावे आहेत. यापैकी रोशन गावडे याचा मृतदेह नालासोपारामधील भुईगाव समुद्र किनाऱ्यावर वाहून आला आहे. वसई-विरारमधील अग्निशमन दलाचे जवान सौरभ पाल याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सौरभ आणि रोशन आपल्या इतर दोन मित्रांसोबत वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरायला आले होते. याठिकाणी ते चौघे समुद्रात उतरले. परंतु समुद्राच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ आणि रोशन बुडाले. या दोघांची मित्रांसोबतची ही पिकनिक शेवटची ठरली.(Latest Marathi news)
पुण्यातही तरुणाचा बुडून मृत्यू
दरम्यान पुण्यात देखील अशीच एक घटना समोर आली आहे. रिल्स तयार करताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना करंजविहिरे परिसरातील भामा आसखेड धरण परिसरात घडली आली आहे. दत्ता भारती असे मृत्यू झालेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील वराळे येथील राहिवाशी आहे. (Pune news)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.