'देशभरात मराठीची सक्ती करणार का? ही भाषा सगळ्यांसाठी यायला पाहिजे'; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला सवाल

Manoj Jarange Patil News : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी देखील यावरून सरकारला थेट सवाल केला आहे.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil NewsSaam Tv News
Published On

अक्षय शिंदे, साम टिव्ही

जालना : महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सगळीकडून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. साहित्यिक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही यासंदर्भात विरोध दर्शवत आहेत. अशातच त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी देखील यावरून सरकारला थेट सवाल केला आहे.

मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 'हे मराठी राज्य आहे. इथे मराठीचीच जास्त सक्ती पाहिजे. ती भाषा सगळ्यांसाठी यायला पाहिजे. एक प्रकारे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. पण मराठीचं काय? देशभरात मराठीची सक्ती करणार आहेत का? ती पण करायला हवी मग. या राज्यांत ज्यांना मराठी येत नाही, त्यांना मराठी आली पाहिजे. त्यांच्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे. ही गोष्टही खूप महत्त्वाची आहे. अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. परंतु, त्याहीपेक्षा आमचा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणाच्याच प्रश्नावर आमचा जास्त फोकस आहे. ते झाल्यावर बाकीच्या प्रश्नांकडे बघू,' असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil News
इलेक्ट्रिक वाहनांची टोलमाफी फक्त कागदावरच? GR काढूनही समृद्धीवर टोल वसुली सुरूच

'सरकार काय करत आहे, हे आम्हाला माहिती नाही. पण आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार. आरक्षण ओबीसीतून घेणार आणि समाजाला मिळवूनही देणार. मी आणि माझा समाज एकही पाऊल मागे सरकणार नाही. मराठ्यांची काय लाट असते, ते २९ ऑगस्टला तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला कळेल, मराठे काय चीज असतात. आता आम्ही मुंबई सोडत नाही. मराठा आरक्षण १०० टक्के घेतल्याशिवाय माझ्यासकट एकही मराठी माघारी फिरणार नाही. तुमची मुंबई बंद पडेल की, सुरू राहील, ते आम्हाला माहिती नाही. परंतु, आम्ही १०० टक्के आरक्षण मिळवणार,' असा एल्गार पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.

Manoj Jarange Patil News
Washim: टवाळखोर तरुणाच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com