देशमुख कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतंय म्हणजे तिरस्काराची वागणूक आहे. ही काय तिरस्कारासारखी वागणूक आहे. त्यामुळे अशा टायमाला शिंदे साहेब मुख्यमंत्रिपदी हवे होते, त्यांनी खपाखप तुरुंगात टाकलं असतं. तंगड्या धरून आपटलं असतं. असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्या नंतर त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासबाबत असमाधान व्यक्त केलं. "सरकार आपल्यासोबत असून आपल्याला न्याय नाही नाहीये. सोबत नसतं तर ठीक असतं. आता न्यायासाठी आंदोलन करावं लागतंय. पण, यापेक्षा कोणते संवेदनशील प्रकरण सरकारला हवंय? अशा वेळेला ते शिंदे साहेबच पाहिजे होते", असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग येथे केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.