Manoj jarange patil protest live updates : जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर दाखल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज सोमवार, दिनांक ०१ सप्टेंबर २०२५, मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाचा चौथा दिवस, राज्यात गणेशोत्सव, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Manoj jarange patil protest live updates :
Manoj jarange patil protest live updates :

वाशी टोल नाका येथे वाहतूक कोंडी

सायन - पनवेल हायवेवर वाशी टोल नाका येथे वाहतूक कोंडी झाली आहे. वाशी ते मानखुर्द पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवारचा दिवस आणि मराठा आंदोलन यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. पोलीसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येत बिघडली असल्यामुळे मुंबईतील जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी पाणी प्यावं असं सल्ला दिलेला आहे. आजपासून जरांगे पाटील पाणी सोडणार आहेत, आजचा उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे.

कणकवलीतील तरंदळेच्या जंगलात आढळली दुर्मीळ चमकणारी बुरशी

कणकवलीतील तरंदळेच्या जंगलात दुर्मीळ चमकणारी बुरशी आढळून आली आहे. दिवसा पिवळसर पांढरी दिसणारी ही बुरशी रात्रीच्या अंधारात चमकून हिरवीगार दिसते. ही बुरशी फक्त जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दिसून येते. या चमकणा-या बुरशीचा शोध निसर्ग अभ्यासक विजय पैठणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला आहे. ही बुरशी सह्याद्रीच्या पट्ट्यातील जंगलात, गुजरात व लक्षद्वीप या ठीकाणी आढळून येते.

प्रतीकात्मक प्रेतयात्रा मराठा समाजाकडून या ठिकाणी काढण्यात आली आहे. सरकारच्या नावाने प्रेत यात्रा काढून आक्रोश केला जात आहे.

मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरे बोलण्यास मनाई आहे. जिथे हवसे,गवसे,नवसे आहेत.. जो लोकांना सर्वात जास्त मूर्ख बनवू शकतो...तो सर्वात चांगला नेता बनू शकतो...श्री कृष्णाने सांगितल्या प्रमाणे अंतिम निर्णय सत्याचा होतो..
नितीन गडकरी

 काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्या नाम फलकावर काळे फासले

- नामफलकावर 'पूर्व नागपूर' लिहिण्याचा वाद,काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्या नाम फलकावर काळे फासले

- भाजप कार्यकर्त्यांनी काळ फसल्याचा आरोप

- अभिजित वंजारी यांचे सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील आंबेडकर चौकात जनसंपर्क कार्यालय आहे..

- अभिजीत वंजारी हे विधान परिषद सदस्य आहेत, असे असताना, त्यांनी कार्यालयाच्या फलकावर 'आमदार अभिजीत वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र' असे लिहिले आहे...

- वंजारी हे स्वतःला पूर्व नागपूरचे आमदार असल्याचे दाखवत असून हे नियमांची पायमल्ली असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाने केला होता....

- यानंतर आमदार वंजारी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील नामफलकाला काळे फासण्यात आले

- काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार केली...

- या प्रकारामुळे पूर्व नागपूर विधानसभेचे भाजप आमदार कृष्णा खोपडे विरुद्ध अभिजित वंजारी यांच्यात वाद तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे...

तायवाडे-भुजबळ यांच्यामध्ये फोनवर चर्चा

- मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांची फोनवरुन चर्चा

- आजच्या मुंबईतील बैठकीत आंदोलनाबाबत जो निर्णय होईल, त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार

- ⁠नागपुरात उपोषण सुरु असल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत डॅा. बबनराव तायवाडे सहभागी होणार नाही

- नागपूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघांच साखळी उपोषण सुरु असल्याने बबनराव तायवाडे बैठकीला जाणार नसल्याचं सांगितलं...

अंतरवली सराटी मध्ये उपोषणाला बसण्याची ओबीसी आंदोलकांनी प्रशासनाकडे परवानगी मागितलीय

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी अंतरवली सराटी मध्ये उपोषणाला बसण्याची ओबीसी आंदोलकांनी प्रशासनाकडे परवानगी मागितलीय.आज दहा वाजता आपण उपोषणाला बसणार असल्याचं ओबीसी कार्यकर्ते बाळासाहेब बटुळे आणि बाळासाहेब दखने यांनी सांगितले आहे मात्र प्रशासनाने या आंदोलकांना आंदोलनाचे स्थळ तसेच आंदोलनाला बसणाऱ्या इतर लोकांची माहिती देण्याचं कळवले आहे.दरम्यान या बाबीची पूर्तता केल्याशिवाय आंदोलकांच्या परवानगीचा निर्णय घेता येणार नसल्याचे पोलिसांनी आंदोलकांना कळवलय. दरम्यान अंतरवली सराटी परिसरातील सोनिया नगर येथे ओबीसी आंदोलक ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. दरम्यान उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

परभणीतून 50 हजार आंदोलकांना पुरेल इतके खाद्य पदार्थ मुंबईकडे रवाना

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील तीन दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर अमरन उपोषण करत असून त्यांच्या सोबत लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र सरकारने खाऊ गल्ली बंद केली असल्याने मराठा आंदोलनाची गैरसोय होत असल्याने परभणी जिल्ह्यात मराठा बांधव सरसावले असून मुंबईतील 40 ते 50 हजार आंदोलकांना पुरले इथल्या भाकरी, ठेचा, लोणचं, मिरचीचे खार, मुरमुरे, कांदे, चटणी, भाजीपाला पाठवला आहे सरकार मराठा आंदोलनावर अन्याय करत असल्याने जो पर्यंत आंदोलन सुरू राहिला तो पर्यंत खाण्याचे पदार्थ पाठवले जाणार असल्याचे यावेळी समाज बांधवांनी सांगितले आ

आजपासून मनोज जरांगे पाटील हे पाणी त्याग ही करणार आहेत ...

त्यात कालच डॉक्टर यांनी त्यांना पाणी जास्त पिण्यास सांगितले आहे ,ors घेण्यास सांगितले आहे ...

सध्या जरांगे यांची शुगर ही फक्त 70 च्या आसपास आहे ...

त्यामुळे पाणी ही त्याग केलास त्यांची प्रकृती खालावू शकते असे डॉक्टर टीम कडून सांगण्यात येत आहे

विरारच्या इमारत दुर्घटनाग्रस्त 60 कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात म्हाडाची घरे; 20 हजाराची आर्थिक मदत

विरारच्या रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनाग्रस्त नागरिकांना राहण्यासाठी शासनाने तात्पुरत्या स्वरूपासाठी म्हाडाची घरे देण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी दुपारी या 60 दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना पालघर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र गावित यांनी म्हाडाच्या घराच्या चाव्यांचा वाटप केला असून प्रत्येक कुटुंबाला 20 हजाराची आर्थिक मदत केली आहे. यावेळी वसई विरार पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अधिकारी उपस्थित होते.

बेळगाव वरून हजारो मराठा बांधव आझाद मैदाना दाखल

मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आझाद मैदानामध्ये लाखो मराठा बांधव दाखल झालेला आहे तसेच कर्नाटक मधील बेळगाव मधील सकल मराठा व मराठी क्रांती सीमा भाग मोर्चा संघटनेच्या माध्यमातून बेळगाव मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हा मुख्य मोर्चा होता

त्यामुळे हजारो मराठा बांधव बेळगाव मधून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानामध्ये उपस्थित झाला आहे

Manoj jarange patil protest live updates : मराठा बांधवांचा सकाळचा नाश्ता मिरची ठेचा

मराठा बांधव दोन दिवस गैरसोय झाली होती त्यानंतर राज्यभरातून माता-भगिनीने मराठा बांधव उपाशी राहू नये यासाठी भाकरी आणि ठेचा पाठवण्यात आला आहे तसेच राज्यभरातून बिस्किट पाण्याची बॉटल कडधान्य जीवनावश्यक वस्तू हे सर्व पाठवण्याच काम करण्यात आलं आहे तसेच सकाळचा नाश्ता मराठा बांधवांचा भाकरी आणि ठेचा मराठा बांधव खाताना दिसून येत आहेत

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वेळेत बदल,जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश

पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषणसंबंधी नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केला आहे.

सुधारणा करण्यात आली आहे असून,आजपासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी दिली होती.मात्र, त्यात बदल करत आता रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या 18 ऑगस्टच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी केले आहेत. .

त्यानुसार आता उद्या २ सप्टेंबर ६ सप्टेंबर या दिवशी पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेणार

खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील मानाच्या गणपतीसह महत्त्वाच्या गणपतीचे आज सकाळी दर्शन घेणार

प्रमुख पाच मानाचे आणि इतर प्रमुख गणेश मंडळासह कार्यकर्त्यांच्या मंडळांनाही भेटी देणार

सकाळी ९.३० वाजल्यापासून कसबा गणपती पासून करणार दर्शनाला सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यातील गणपतीचे घेणार दर्शन

आज दुपारी अडीच वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत मुख्यमंत्री पुण्यात

मानाचा गणपती सह इतर गणपतीचे घेणार दर्शन

अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपती दर्शनालाही जाणार

पीएचडी साठी 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशा च्या पुढील फेरीला सुरुवात

प्रवेश प्रक्रियेत मुलाखतीसाठी 100 गुण राहणार आहेत

अंतिम निकाल तयार करताना प्रवेश प्रक्रियेतील परीक्षेच्या गुणांना अधिक महत्त्व दिले जाणार

Manoj Jarange Patil Protest Live Updates :

मराठा आंदोलक आणि जरांगे पाटील यांची बदनामी करणाऱ्यांना तृप्ती देसाईंचे जोरदार प्रत्युत्तर- योध्दा शरण जात नाही तेंव्हा बदनाम केला जातो. बरोबरी करता येत नाही तर बदनामी तरी करू नका
तृप्ती देसाई

महापालिकेसाठी नवं 'सुरक्षा दल' सज्ज,क्युआरटीची पहिली तुकडी उद्यापासून सक्रिय

पालिका अधिकारी यांच्यावर होणारे हल्ले आंदोलन पालिकेचे नुकसान यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कृती दलाची निर्मिती

पथकातील दहा जणांची पहिली तुकडी आज पासून मुख्य इमारतीच्या सुरक्षिततेसाठी सेवेत रुजू होणार आहे.

काही दिवसांपूर्वी आयुक्त कार्यालयात झालेल्या गोंधळानंतर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेकडे सध्या १२०० सुरक्षा कर्मचारी आहेत.त्यापैकी ५० कर्मचाऱ्यांची क्युआरटीसाठी निवड करण्यात आली असून, प्रशिक्षित दहा कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी आजपासून कार्यरत

पुढील टप्प्यात महापालिकेच्या पाच परिमंडळांत प्रत्येकी पाच जणांचे क्युआरटी पथक नियुक्त केले जाईल. अतिक्रमण,आकाशचिन्ह विभाग,१५ क्षेत्रीय कार्यालये, वाहन विभाग, कचरा डेपो, उद्याने, पाण्याच्या टाक्या अशा ठिकाणीही या पथकांची नेमणूक होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com