रत्नागिरी: ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे राजन साळवी यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनते प्रवेश केला आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्याने कोकणात ठाकरे गटाला मोठी खिंडार बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशातच आता नाशिक नंतर कोकणात ऑपरेशन टायगर हे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे.
राजेंद्र महाडीक यांची हकालपट्टी
ठाकरे गटाने रत्नागिरी जिल्ह्यातील सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळुण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरे गटाने पक्षातून हकालपट्टी केली आहे. आज एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत जिल्ह्यातील माजी आमदार सुभाष बने, गणपतराव कदम यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रत्नागिरीत उबाठाला गळती
रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी चार जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यातही तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार आमदार म्हणून विजयी झाले. अशातच एकनाथ शिंदेंचा दौरा पक्षाला अधिकच ताकद देणारा ठरू शकतो. राजन साळवी यांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटाला मोठी खिंडार बसली आहे. त्यातच आज प्रमुख नेत्यांसह 150 हून अधिक नेते पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.