Maharashtra Weather : थंडीची प्रतीक्षा कायम! 3 दिवसात महाराष्ट्रात तापमान बदलणार, IMD नं काय दिला इशारा?

Maharashtra Winter Weather : राज्यातील गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातही थंडी कमी झालेली दिसतेय. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात थंडी कधी परतणार? याकडे सर्वांनी डोळे लावलेत.
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather UpdateSaam tv
Published On

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडी कमी झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी परतण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र अद्यापही थंडीची तीव्रता राज्यात जाणवत नाही. काही भागांत सकाळच्या वेळी धुके आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठे चढ-उतार होत असल्याचे निरीक्षण केले गेले आहे. उत्तर भारतातही थंडीचा प्रभाव कमी झाल्याने याचा प्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावर दिसून येतोय.

Todays Maharashtra Weather Update
Todays Maharashtra Weather Update

सध्या राज्यात कमाल आणि किमान तापमानामध्ये सतत बदल होत आहेत, मात्र पुढील काही दिवसांत हवामानात बदल होईल आणि थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या चक्राकार वारे निर्माण झाले आहेत, ज्याचा परिणाम हळूहळू महाराष्ट्रावरही होऊ शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत राज्यात तापमान वाढू शकते, ज्यामुळे दुपारच्या वेळी थोडा उकाडा जाणवेल. सकाळी मात्र तापमान कमी राहील, त्यामुळे थंडी पुन्हा एकदा जाणवण्याची शक्यता आहे. काही भागात नागरिकांना वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

महाराष्ट्रात कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 2 ते 4 अंश सेल्सियसने तापमान वाढू शकते. मात्र, विदर्भात 4 ते 5 अंशांनी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून राज्यात पुन्हा थंडी जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील तापमान 10 अंश सेल्सियसच्या खाली गेले होते, मात्र महिन्याच्या शेवटच्या दिवसांत अवकाळी पावसाने तापमानात वाढ झाली. आता किमान तापमान 15 अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. तरीही, पुढील काही दिवसांत पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता आहे आणि थंडी परत येईल. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, कडाक्याची थंडी जाणवण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com