Maharashtra Heatwave: राज्यात उष्णतेचा कहर; नाशिकमध्ये तापमान ओलांडणार 'चाळीशी', तर पुणे, नंदुरबारातील पारा 39.5 अंशावर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढलीय. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झालीय. नाशिकमध्ये आज तापमानाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Maharashtra Heatwave
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

राज्यातील उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस उसळी घेऊ लागलाय. गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेने कहर केलाय. सोमवारी पुणे, नंदुरबार शहरांचा पारा 39.5, तर अकोला शहराचे तापमान 38.8 अंश सेल्सिअसवर गेलाय. मागील काही दिवसांपासून कमाल तापमान 35 अंशांवर असलेल्या नाशिक शहरातील तापमानाचा पारा सुद्धा वाढलाय.

सोमवारी उष्णतेची लाट चांगलीच जाणवली. पुणे, नंदुरबार, मुंबई ही शहरे चांगलीच तापली होती. मात्र, काही भागांतील कमाल तापमानात किंचित घट झाल्याची नोंद करण्यात आली. कमाल तापमानाचा पारा एक अंशाने कमी झाला होता. मात्र पुण्यासह, नंदुरबार आणि अकोला शहरांचा पारा सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक ठरला. नाशिकमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला असून तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Maharashtra Heatwave
Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पात अजित पवारांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; महाबजेटमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळालं?

मुंबईत उष्णतेचा कहर

सोमवारी मुंबई आणि तेथील सांताक्रुझ भागाचा पारा अनुक्रमे 36.4 आणि 37.2 अंशांवर गेला होता. त्यामुळे मुंबईकरांच्या घामाचा धारा वाहू लागल्या होता. यावर्षाच्या हंगामात मुंबईचे तापमान सलग तिसर्‍यांदा 36 अंशांपेक्षा जास्त वाढले आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये पारा 38 ते 40 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तविली जातेय.

Maharashtra Heatwave
Maharashtra Weather: उष्णतेचा भडका! सूर्य आणखी आग ओकणार, राज्यात आज कुठे कसं तापमान?

नाशिक तापलं

नाशिकमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आलाय. तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून कमाल तापमान 35 अंशांवर आहे. सोमवारीदेखील 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. पुढील पाच दिवस उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

इतर जिल्ह्यातील तापमान

गेल्या 24 तासांत गुजरातमधील राजकोट येथे देशातील उच्चांकी 41.1 अंश तापमानाची नोंद झालीय. राज्यात अकोलासह सोलापूर, ब्रह्मपुरी, सांगली येथे 39 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. जेऊर, जळगाव, परभणी, नागपूर, चंद्रपूर येथे कमाल तापमान 38 अंशांवर पोचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com