
राज्यात गेल्या १५ दिवसांपासून ऊन -पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. काही जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये तापमान प्रचंड वाढले आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढणार आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण, उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान खात्याने केला आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. याठिकाणी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे. अकोला राज्यात सर्वाधिक हॉट शहर असून सध्या पारा ४४ अंशाच्या वर गेला आहे. अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होत असल्याने उष्ण लाटेसाठी अनुकूल वातावरण बनत आहे. त्यामुळे उष्णतेचे चटके आणखी बसणार आहे. उष्णतेला अनुकूल वातावरण असल्यामुळे विदर्भात पुन्हा सूर्य आग ओकणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.